लालबावटा शेतमजूर युनियन (BKMU) चे धरणे आंदोलन सौरउर्जा प्रकल्प गायरानात न करणेबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक दिलीप स्वामी यांनी सौर उर्जा अधिकाऱ्याशी फोनवर केली चर्चा

लालबावटा शेतमजूर युनियन(BKMU)चे धरणे आंदोलन
सौरउर्जा प्रकल्प गायरानात न करणेबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक
दिलीप स्वामी यांनी सौर उर्जा अधिकाऱ्याशी फोनवर केली चर्चा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर दि.४: गायरान जमीन कसत असणाऱ्या व घरे बांधून राहणाऱ्या गायरान धारकांना सौरउर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हुसकावून लावले जात असल्याच्या निषेधार्थ आज भारतीय खेत मजदूर युनियन (BKMU) शी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायरान धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य कार्याध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती ,राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव कॉ.गणेश कसबे .कॉ.सयाद अनिस यांच्या नेत्र्वाताखाली झालेल्या या आंदोलनात सिल्लोड,फुलंब्री,सोयगाव,गंगापूर व औरंगाबाद या ५ तालुक्यातील २७ गावातील सुमारे २५० गायरानधारक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ.आड. अभय टाकसाळ ,कॉ.त्र्यंबक शेजवळ ,कॉ.रुख्मान श्रीखंडे,कॉ.प्रताप चव्हाण यांची भाषणे झाली.
संध्याकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना शिष्टमंडळ भेटले व विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.सौरउर्जा प्रकल्प गायरानात न करणेबाबत जिल्हाधिकारी स्वामी सकारात्मक असल्याचे यावेळी दिसले.त्यांनी तातडीने संबधीत सौर उर्जा अधिकाऱ्याशी लगेच फोनवर चर्चा केली व अधिकाऱ्याना १-२ दिवसात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाचाराणही करणार आहेत.
विविध गावातील गायरान जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी सर्वेक्षण सुरु झाले आहे. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे गायरानातील दोन-तीन एकर -२
२
जमिनीवर अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षापासून अनेक गायरानधारक जमीन कसत आहेत व अर्ध्या एक गुंठ्याच्या जागेवर कच्ची घरे बांधून राहत आहोत.गायरानधारक रहात असलेल्या व कसत असलेल्या गायरान जमिनी ताब्यात घेऊन विकासाचे प्रकल्प राबऊ नयेत असे आवाहन लाल बावटा शेतमजूर युनियनने चर्चेदरम्यान केले. सिल्लोड येथे १० एकर जागेवर असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती हलवण्याचे व ४ कि.मि.अंतरावर असलेल्या भवन येथील गायरान जमिनीत ही बाजार समिती हलवण्यात येत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी स्वामी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कॉ.बाहेती,कॉ.कसबे यांच्यासह कॉ.सयद अनिस, हरिभाऊ हाटकर, कॉ.राजू साठे,संजय तावरे,पोपटराव कुर्ह्हाडे ,बबन बोराडे, पुंजाराम कांबळे,सुनिता दांडगे,गयाबाई सोनावणे,लीलाबाई सोनावणे,माणिक शेजूळ,इंदुमती केवट ,गणेश सुसे आदी २५ जणांचा सामावेश होता.
१८ मार्च रोजी मंत्रालयावर लालबावटा मोर्चा काढणार
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व समविचारी संघटनाच्या वतीने मंगळवार १८ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे मंत्रालयावर हजारो गायरानधारकांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मागण्या
१) १९९१ च्या जीआर मधील तारीख बदलून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे
नियमित करा.गायरानजमीन कसणाऱ्या सर्व भूमीहीनाच्या नावावर पट्टे करा.
२) सौर उर्जा व विकासाचे प्रकल्प गायरानात राबू नका.
३) घरकुल धारक गायरान धारकांना घरांचा मालकी हक्क दया.
४) कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहीन स्वाभिमान योजनेत योग्य ते बदल
करून सर्व भूमीहीनांना जमीनी द्या
५) सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भवन येथील गायरानात हलऊ नका
What's Your Reaction?






