एकच संत ज्यांना आई म्हटले जाते ते म्हणजे संत ज्ञानेश्वरप्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे प्रतिपादन

*एकच संत ज्यांना आई म्हटले जाते ते म्हणजे संत ज्ञानेश्वर*
*प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे प्रतिपादन*
माहिती व जनसंपर्क विभाग
दि.२१ ऑगस्ट
सर्व संतांनी मानवतेचा संदेश दिला .पण एकच संत ज्यांना अवघे विश्व आई म्हणते ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्याप्रमाणे आई मुल कसेही असेल तरी त्याचे सर्व वाईट गुणांसह त्याच्यावर प्रेम करते, संत ज्ञानेश्वर यांनी समस्त विश्वासाठी मागितलेले दान म्हणजे पसायदान आहे. त्यात 'जे खळांची व्यंकटी सांडो' . वाईट लोक नव्हे तर त्यांची वाईट बुद्धी नष्ट होवो हे मागितले म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात. असे प्रतिपादन प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी रक्षाबंधनानिमित्त म.न.पा.केंद्रीय शाळेत केले.
मा.आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल ' या प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तावाढीसाठी म.न.पा. च्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.याच अनुषंगाने उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे , नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.पा.च्या शाळांमध्ये विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. त्या अंतर्गत म.न.पा.केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सूलगाव शाळेमध्ये रक्षाबंधनानिमित्त 'मैत्र जीवांचे' या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यानंतर रक्षाबंधन चे महत्व आणि त्या सणामागचा उद्देश त्यांनी कथन केला. विद्यार्थी यांनी एकमेकांना राख्या बांधल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात प्रास्ताविक अंकुश लाडके यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन हेमा वैष्णव यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक ,अंकुश लाडके,संजय कुलकर्णी ,रमेश वाडेकर, संगीता सहाने, हेमा वैष्णव, सविता बांबर्डे,अनिता मस्के , यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






