मिरवणुकीत दुचाकी घातली, नंतर जमाव घरात घुसला, कुटुंबाला बेदम मारहाण,केली दंगलसदृश स्थिती, १६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

: मिरवणुकीत दुचाकी घातली, नंतर , गावात दंगलसदृश स्थिती, १६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत ट्रिपलसीट दुचाकी घालणाऱ्यांना दुसरीकडून जाण्यास सांगितले असता त्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे मिरवणुकीतील एकाने त्याच्या कानशीलात वाजवली. त्याची परिणीती दुसऱ्या दिवशी १५ ते २० जणांनी मिळून कानशीलात वाजविणाऱ्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात झाली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. चिकलठाणा पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. गावाला छावणीचे स्वरुप आले आहे.
चौघांना अटक
पोलिसांनी हल्लेखोर अब्दुल अकबर शेख, हनीफ यासीन शेख, हुसेन बाबूलाल शेख, सद्दाम शेख, अदिल पटेल, जाकेर शेख, जावेद शेख, शाहरुख शेख, साहिल शेख, फरान खान, गुड्डू शेख, मुन्ताज पठाण, अलीम शेख, अश्पाक शेख, इमरान शेख, अमन शेख व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले. अब्दुल अकबर शेख हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध बेगमपुरा व चिकलठाणा ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
गावात तणाव
या घटनेनंतर गावात संतप्त भावना व्यक्त झाल्या. सोमवारी दुपारी एकला चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ७० ते ८० जणांचा जमाव जमला होता. ग्रामीण उपअधीक्षक पूजा नांगरे, सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर, चिकलठाण्याचे रविकिरण दरवडे यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त ठेवण्यातत आला आहे. घटनेबाबत गोरख शिंदे म्हणाले, की मुलांचे भांडण झाले होते. गावातील समजदार माणसे एकत्र येऊन वाद मिटवू असे समजावून सांगत असतानाच त्यांनी अचानक
खुमखुमी कायम, दुसऱ्या दिवशी कुटुंबावर हल्ला
ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडण मिटवले. त्यानंतर सोमवारी सकाळी अकराला अब्दुल अकबर शेख, हनीफ यासिन शेख, हुसेन बाबूलाल शेखसह १५ ते २० जण गोरख शिंदे यांच्या घरी गेले. शिंदे यांनी मुलांचे वाद मिटवून घेऊ, असे सांगत बसण्यास चटई दिली. चहादेखील सांगितला. मात्र, त्याचवेळी विशालवर हल्ला चढविण्यात आला. टोळक्याने घरात घुसून गोरख शिंदे यांच्या पत्नी, मुलगा व मुलीला बॅट, दांड्याने मारहाण केली. हा प्रकार गावात कळताच दोन्ही गट आमनेसामने आले. दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.
What's Your Reaction?






