बिहार येथील बुद्ध विहार ब्राह्मणाच्या ताब्यातुन सुटका घेण्यासाठी मोठ्या आंदोलनारीची तयारी रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गट रस्त्यावर

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपाइंचे (आठवले) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने आज मंगळवारी (दि.18) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला 12 फेब्रुवारी पासून 1949 चा बोधगया मंदिर कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी बुद्धगया येथे भिक्खू संघाने उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके जिल्हाध्यक्ष विजय मगरे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना बाबुराव कदम म्हणाले महाबोधी महाविहार हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे 1949 च्या बोधगया मंदिर कायदा अंतर्गत या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही या कायद्यानुसार मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये नऊ सदस्य असतात त्यापैकी पाच अन्य समाजाच्या आणि केवळ चार बौद्ध समाजाचे असतात ही न्यायिक बाब नाही हे बौद्ध समाजाच्या हक्कावर थेट हल्ला आहे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे तसेच 1949 चा कायदा रद्द करून बौद्ध विहार मुक्तीसाठी नवीन कायदा करण्यात यावा केंद्र सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अन्यथा देशभर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री. कदम यांनी यावेळी दिला या आंदोलनानंतर एका शिष्टमंडळांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना मागणीचे निवेदन दिले या आंदोलनामध्ये बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवचारमल, लक्ष्मण हिवराळे, रवी जावळे, आनंद शिंदे, महेंद्र शिंदे, राहुल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, खुलताबाद तालुका अध्यक्ष फकीरराव भालेराव, फुलंब्री तालुकाध्यक्ष राजू प्रधान, वैजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, कन्नड तालुका अध्यक्ष संदीप सातदिवे, पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे, एकनाथ शरणागत, भाऊराव गवळे, सूर्यकांत पठारे, अमोल कोतकर, बाळासाहेब नरवडे, आप्पाराव इंगोले, पांडुरंग गायकवाड, अमोल कसाब, मंगेश साबळे, शेख सलीम, समीर शेख, राहुल पाटील, कृष्णा वावळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
What's Your Reaction?






