गंगापूरात गोदा काठच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी जलसमाधी आंदोलन

 0
गंगापूरात गोदा काठच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी जलसमाधी आंदोलन
गंगापूरात गोदा काठच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी जलसमाधी आंदोलन

असंपादित जमिनीत जायकवाडी धरण फुगवट्याचे शिरले पाणी

गंगापूर, (प्रतिनिधी) जायकवाडी धरणामध्ये गाळ साचल्याने बैंक बाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी तालुक्यातील शेकडो एकर असंपादित जमीन व पिकांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या परिसरातील शेतक-यांचे हातातोंडाशी आलेले पीके पाण्यात गेली त्यामुळे बळीराज्याचे आर्थिक नुकसान झाले आहे, या नुकसान भरपाईसाठी वेळोवेळी शासन दरबारी अर्ज तक्रारी, निवेदन देऊन हतबल झालेल्या गळनिंब, मिवधानोरा, नेवासा, व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अमळनेर येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन केले.

यासंदर्भात माहिती अशी की, गोदावरी विकास खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना त्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये उच्च न्यायालयासह संबंधित मंत्री व विभागांनी शेतकऱ्यांच्या

जमिनी संपादित करून त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत वेळोवेळी आदेश व आश्वासने देउनही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांना जलसमाधी

आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले आहे. यादरम्यान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे ही भरपाई मिळावी, याच

शाखा अभियंता जायकवाडी जलभूगवटा शाखा क्र.२ गंगापूर, एम एस शेलार शाखा अभियंता जायकवाडी जल फुगवटा शाखा क्र.१ गंगापूर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधून आंदोलन थांबविण्यासाठी मनधरणी केली. पण वरिष्ठांनी लवकर निर्णय न घेतल्याने आंदोलन दिवसभर चालले.

या आंदोलनात राधेश्याम कोल्हे, इसाभाई पठाण, समद पठाण, बालचंद पंडित, मोहन टेकाळे, विक्रम पंडित, सुखदेव गवारे, विनायक इव्हान, कचरू साळवे, खडू भरपूरे, किरण साळवे, विलास म्हसरूप, शेवगाव, नेवासा तालुक्यातील रंगनाथ चेडे, कैलास म्हसरूप, अनंत व्यवहारे, बापूसाहेब दहातोंडे, गणेश मिसाळ, भाऊसाहेब पंडित, हकीम पठाण, मुनिर पठाण, जनार्धन मिसाळ, शाईन पठाण, मीना कोल्हे, मंदा दरगुडे, अलका

मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी दीपक डोंगरे उपविभागीय अभियंता जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.५, नेहा धुळे

आंदोलक पडले चक्कर येऊन पाण्यात दिवसभर गार पाण्यात जलसमाधी आंदोलन करत असताना शेतकरी पाण्यात गारठले होते. त्यामुळे इसाभाई पठाण यांना वात आला, शरीराला मुंग्या आल्या, चक्कर येऊन पाण्यात कोसळून गार पडले होते. त्यांना ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी तत्काळ उपचार्थ गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. तेथे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी भेट देऊन इसाभाई पठाण यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आपल्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्या पर्यंत पाठवून आपल्याला न्याय देऊ पण थोडे वेळ देऊन प्रशासनास सहकार्य करावे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी असे आवाहन केले.

नरवडे, रामकृष्ण दरगुडे, महादेव शिस्वत, शिवाजी दरगुडे, विष्णू, काळे अगरकानडगाव येथील वसंत दंडे, बाळासाहेब पवार यांच्यासह आदी शेतकरी सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस

अधिकारी डॉ. दिलीप भागवत यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन माहिती घेतली. गंगापूर पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली देगा काबू पथक व पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow