बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक करा, या मागणीसाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरु तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू.

बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक करा, या मागणीसाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरु
तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू.
ॲड अझीम कुरैशी, सलीम शेख शरीफ, फैसल खान यांच्या पाठिंबा
औरंगाबाद प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर वक्तव्य करणारे बाबा रामगिरी व मुस्लिम बद्दल भडकाऊ भाषण केल्याने नितेश राणे यांना अटक करा, वक्फ बिल विरोधात या विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने तीन दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्याबदल अपशब्दाचा प्रयोग करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असले वक्तव्य करु नये तथा कोणत्याही धर्माचे देवी, देवता, धर्मगुरु यांच्या विरोधात अपशब्द बोलू नये यासाठी वक्तव्य करणाऱ्या विरोधात कठोर शिक्षेचे प्रावधान करण्यासाठी कडक कायदा बनवावा. केंद्र सरकारने आणलेले वक्फ बील-२०२४ हे सुधारणा बील परत घ्यावे. औरंगाबाद शहराचे नाव जशास तसे ठेवावे. नवीन शहराला छ. संभाजिनगर नाव देऊन दोन महानगरपालिका अस्तित्वात येईल असा निर्णय घ्यावा. यावेळी मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी, महासचिव मेराज सिद्दीकी, मौलाना इलियास फलाही, ॲड अझीम कुरैशी
उपाध्यक्ष महाराष्ट्र कुरैश कॉन्फरन्स,समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष फैसल खान, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव शेख सलीम, अय्युब खान, कामरान खान, शेख ताहेर, मोहम्मद जब्बार,शेख शफीक,आदी उपस्थित होते
What's Your Reaction?






