प्रेत ताब्यात देण्यास तेरा तासांपेक्षा जास्त काळ ताटकळत ठेवणारे गेवराई पोलीस स्टेशन.

प्रेत ताब्यात देण्यास तेरा तासांपेक्षा जास्त काळ ताटकळत ठेवणारे गेवराई पोलीस स्टेशन.
पोलीस निरीक्षक बीड यांना दिले
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मौजे बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड येथील रहिवाशी ज्ञानेश्वर महानोर या तरूणाने दि.२५/८/२०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्या संदर्भात ज्ञानेश्वर महानोर यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या व्यक्ती विरोधात गेवराई पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी बागपिंपळगाव येथील शेकडो महिला व पुरुष गेलेले असतांना पोलीस निरीक्षक श्री प्रवीण बांगर साहेबांनी प्रथमता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती.अनेक विनंत्या केल्या नंतर श्री बांगर साहेबांच्या सुचने वरुण पोलीस उपनिरीक्षक श्री दिपक लंके साहेब यांनी फिर्यादी कडून सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर श्री माळी साहेबांना तक्रार लिहून घेण्याचे सांगून श्री लंके साहेब निघून गेले.
त्या नंतर परत फिर्यादी कडून श्री माळी साहेबांनी घटनाक्रम ऐकून घेऊन महत्वाच्या घटनांचा उल्लेख टाळून फिर्याद लिहिली.त्यावर फिर्यादीसह बागपिंपळगावच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेत मूळ फिर्यादीवर सही करण्यास विरोध दर्शवून पुरवणी जबाब घेण्याची विनंती केली असता.श्री माळी साहेब जेवणाचे कारण देत पोलीस स्टेशन मधून निघून गेले.
त्या नंतर काहि तासाने आलेल्या श्री लंके साहेबांनी पुरवणी जबाब कायद्याने घेताच येत नाहि आसे सांगून पुरवणी जबाब घेण्यास नकार दिला.त्या नंतर आम्ही सर्वांनी मयत ज्ञानेश्वर महानोर यांचे प्रेत घेऊन पोलीस अधिक्षक कार्यालय बीड येथे जाण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे सांगितल्यावर श्री लंके यांनी पुरवणी जबाब लिहून घेतला.
परंतु पुरवणी जबाब नोंदवून घेतल्यानंतर नंतर श्री लंके साहेबांनी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्याचे सोडून फोन काॅल रेकाॅर्डिंग परत परत ऐकणे,पेन ड्राईव्हची मागणी करणे, पेन ड्राईव्ह दिल्या नंतर पेन ड्राईव्हच्या बिलाची मागणी करणे, मोबाईल शाॅपीच्या दुकानाच्या लायसन्सची मागणी करणे,पोलीस उपनिरीक्षक श्री जंजाळ साहेबांना मदतीस घेऊन साक्षीदारांचे व्हिडिओ शूटिंग करुण ऐकूण घेतलेला जबाब पहिले रफ कागदावर लिहून घेऊन नंतर फेर करत बसणे अशी एक ना अनेक कारणांनी श्री लंके साहेबांनी प्रेत देण्यास जाणून बुजून उशिर केला.त्या नंतर लंके साहेबांनी जबाब नोंदवून घेण्याचे कारण सांगून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय माणिकराव हाळनोर यांना दि.04/08/2024 रोजी छत्रपती संभाजी नगरहून गेवराई पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.आणि दि.4 रोजी संघटना अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांना त्रास देण्याच्या हेतूने जाणून बुजून अपूर्ण परत दि.6 रोजी म्हणजे तिसर्या दिवशी छत्रपती संभाजीनगरहून गेवराई पोलीस स्टेशनला दिपक लंके यांनी बोलावून घेतले.
तपास अधिकारी श्री लंके साहेबांनी मयत ज्ञानेश्वर महानोर यांचे प्रेत ताब्यात देण्यास तब्बल 13 तासांचा कालावधी लावल्या मूळे अख्खे गाव तर ताटकळत ठेवलेच परंतु अंतविधीसाठी बाहेर गावा वरुण आलेले अनेक पाहूणे देखील आल्या हाती परत गेले.आशा प्रकारे त्रास देण्या मागील तपास अधिकारी श्री दिपक लंके साहेबांचा हेतू गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन गावातील तरूणांनी विना परवाना रस्ता रोको वगैरे असे काहि तरी गैरकृत्य करावे व त्या नंतर मी संघटनेच्या अध्यक्षासह इतर तरुणावर गुन्हे दाखल करूण आरोपींना सोडून फिर्यादींनाच अटक करावी आसा हेतू दिपक लंके साहेबांचा असावा असा आरोप संघटनेच्या अध्यक्षांनी केलेला आहे.
या बाबत सखोल चौकशी करूण सदर प्रकरणी इतर दुसऱ्या तपास अधिकार्याची नेमणूक करण्यात यावी.अन्यथा तहसील कार्यालय गेवराई येथे तिव्र आंदोलन करण्यात येईल आशा आशयाचे निवेदन फिर्यादी संतोष हरिभाऊ जानकर व संघटनेचे अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे रितसर देण्यात आलेले आहे.
What's Your Reaction?






