देशमुख हत्येप्रकरणी व सूर्यवंशी दुर्दैवी मृत्यू बाबत पारध कडकडीत बंद

देशमुख हत्येप्रकरणी व सूर्यवंशी दुर्दैवी मृत्यू बाबत पारध कडकडीत बंद
भोकरदन प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
भोकरदन तालुक्यातील पारध येथे- बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली आहे तसेच परभणी येथे संविधानाची झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झालेल्या कायद्याचे तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिसांनी कोंबीग ऑपरेशनच्या काळात अटक केली होती. यानंतर पोलिस कोठडी घेवुन नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांचा रविवार (ता.१५) रोजी पहाटे संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २६) पारध येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. व मुक मोर्चा काढण्यात आला, मराठा समाज व पारध येथील भीमसैनिक यांनी सोशल मीडियातून बंदचे आवाहन केले होते. तसेच पारध पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते, या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. व मुक मोर्चात उपस्थित राहिले. सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घण हत्या ही निंदनीय घटना असून, या घटनेचे आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. मराठा समाज व भीमसैनिकानी बुधवारी रात्री बंद पुकारण्याचे ठरविण्यात आले. तसेच काही समाज बांधवांनी सकाळी परिसरात फेरी मारून सुरू असलेल्या दुकानात जाऊन त्यांना बंदचा हे सांगताच व्यावसायिकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला.
What's Your Reaction?






