नूतन आमदारांचे डोळे आता नव्या सरकारच्या स्थापनेकडे अतुल सावे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, संजय शिरसाट मंत्रिपदाचे दावेदार

नूतन आमदारांचे डोळे आता नव्या सरकारच्या स्थापनेकडे अतुल सावे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, संजय शिरसाट मंत्रिपदाचे दावेदार
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच नवीन सरकारचा शपथविधी होईल, नव्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नऊ आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवीत महाविकास आघाडीचे पानिपत केले. यात अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) व अब्दुल सत्तार (सिल्लोड) हे विद्यमान मंत्री असून सतत चौथ्यांदा विजयी झालेले संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम) व प्रशांत बंब (गंगापूर) हे दोघेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात
मुंबईला रवाना
विधानसभा
निवडणुकीच्या निकालानंतर
आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अब्दुल सत्तार, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव,
आ. प्रशांत बंब हे मुंबईला रवाना झाले.
यांची पूर्वीपासूनच मंत्रीपदाची मागणी आहे. किंबहुना ठाकरेंच्या सरकारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज शिरसाटांनी शिंदेसेनेची ध्वजा त्वेषाने फडकावली. शिंदेसेनेचे प्रवक्तेपदही त्यांनी सांभाळले. मात्र, मागच्या कार्यकाळात मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही. संदीपान भुमरे
'संजय शिरसाट मंत्रिमहोदय', समर्थकांनी लावले पोस्टर्स
• औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील नवनिर्वाचित
आमदार संजय शिरसाट यांना शिंदे सरकारच्या
काळात मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी
नव्या मंत्रिमंडळात आपण मंत्री होऊ आणि जिल्ह्याचे
पालकमंत्रीही होणार असल्याचे आमदार शिरसाट
यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले होते.
• रविवारी त्यांच्या समर्थकांनी शहरात संजय शिरसाद मंत्रिमहोदय' अशी पोस्टर्स लावल्याचे पाहायला मिळाले. ही पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत.
यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा ते बाळगून होते; परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. नुकतेच त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. मला मंत्रिपद हवे, अशी वेळोवेळी जाहीर मागणी करणाऱ्या
आ. शिरसाट यांना मंत्रिपद मिळते की नाही, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 'लोकमत'शी बोलताना स्वतः आ. शिरसाट यांनीही मंत्रिपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
आ. बंब हेदेखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात. यंदा जिल्ह्यातून महायुतीच्या दोन महिला अनुराधा चव्हाण (फुलंब्री) व संजना जाधव (कन्नड) विजयी झाल्या असून त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून चांगली कामगिरी बजावली. शिवाय संजनांच्या मागे त्यांचे वडील भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे पाठबळ आहे, तर अनुराधा चव्हाण यादेखील प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. खा. भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हेदेखील जि.प.चे सभापती राहिले आहेत. त्यांच्यासाठी खा. भुमरे किती शक्ती पणाला लावतात, हे महत्त्वाचे.
अतुल सावे व अब्दुल सत्तार हे दोघे मंत्री आहेत. सत्तांतर घडवून आणण्यात पुढाकार घेतलेले अब्दुल सत्तार आणि जातीच्या गणितात पुढे असलेले अतुल सावे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसते, तर शिवसेनेच्या दुभंगानंतर शिंदे सेनेची प्रभावी
What's Your Reaction?






